Posts

Showing posts from June, 2023

विज्ञान भारती Exam 6th to 12th

Image
महोदय,           विज्ञान भारती ही आपल्या देशातील सर्व राज्यांमध्ये व अन्य ६ देशामध्ये पसरलेली चळवळ आहे आणि या अंतर्गत स्वदेशी भावनेशी निगडीत विज्ञाननिष्ठ असे विविध कार्यक्रम उपक्रम या मार्फत राबवले जातात ( www.vibhaindia.org ). त्यातील एक उपक्रम म्हणजे "विद्यार्थी विज्ञान मंथन" (VVM) ही वैज्ञानिक प्रतिभा / प्रज्ञा शोध परीक्षा, जी एनसीइआरटी (NCERT) व विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जाते.या परीक्षेची नोंदणी सुरू झाली आहे . या परीक्षेला ४० प्रश्न हे भारताचे विज्ञान विश्वातील योगदान, बिरबल साहनी यांचे जीवनकार्य व भारतीय स्वतंत्रता संग्राम आणि विज्ञान या विषयावर असून ५० प्रश्न पाठ्यक्रमावर व १० प्रश्न तर्कावर आधारित असतील.             सर्व प्रश्न बहू पर्यायी असतील. पहिल्या ४० प्रश्नासाठी लागणारी पुस्तके विविमं च्या वेबसाईट ( https://vvm.org.in ) वर मिळतील. ही परीक्षा दरवर्षी इयत्ता ६ वी ते ११ च्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. सर्व नोंदणी प्रक्रिया तसेच प्राथमिक परीक्षाही ऑनलाईन (ONLINE) असते.       ...

विज्ञान भारती Exam 6th to 12th

Image
महोदय,           विज्ञान भारती ही आपल्या देशातील सर्व राज्यांमध्ये व अन्य ६ देशामध्ये पसरलेली चळवळ आहे आणि या अंतर्गत स्वदेशी भावनेशी निगडीत विज्ञाननिष्ठ असे विविध कार्यक्रम उपक्रम या मार्फत राबवले जातात ( www.vibhaindia.org ). त्यातील एक उपक्रम म्हणजे "विद्यार्थी विज्ञान मंथन" (VVM) ही वैज्ञानिक प्रतिभा / प्रज्ञा शोध परीक्षा, जी एनसीइआरटी (NCERT) व विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जाते.या परीक्षेची नोंदणी सुरू झाली आहे . या परीक्षेला ४० प्रश्न हे भारताचे विज्ञान विश्वातील योगदान, बिरबल साहनी यांचे जीवनकार्य व भारतीय स्वतंत्रता संग्राम आणि विज्ञान या विषयावर असून ५० प्रश्न पाठ्यक्रमावर व १० प्रश्न तर्कावर आधारित असतील.             सर्व प्रश्न बहू पर्यायी असतील. पहिल्या ४० प्रश्नासाठी लागणारी पुस्तके विविमं च्या वेबसाईट ( https://vvm.org.in ) वर मिळतील. ही परीक्षा दरवर्षी इयत्ता ६ वी ते ११ च्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. सर्व नोंदणी प्रक्रिया तसेच प्राथमिक परीक्षाही ऑनलाईन (ONLINE) असते.       ...

मी कलेक्टर डॉ राजेंद्र भारूड....

Image
**मी आहे नंदुरबार जिल्ह्याचा कलेक्टर *****(डॉ, राजेंद्र भारुड)____माझा जन्म कोणाच्या घरात आणि कोणत्या समाजात व्हावा हे माझ्या हातात नव्हतं. मी साक्री तालुक्यातील सामोडे गावात भिल्ल जमातीत जन्म घेतला आणि माझं जगणं सुरू झालं. जगताना पावलो पावली संघर्ष होता, अडचणी होत्या. परिस्थिती प्रतिकूल होती; पण त्याचा बाऊच करत राहिलो असतो तर आज ही आयएएस ऑफिसर पर्यंतची मजल गाठता आलीच नसती. मला माझ्या आयुष्यात कोणतीच गोष्ट सहज मिळाली नाही, किंबहुना मिळालीच नाही. अभावाच्या या जगण्याला निसर्गाची भक्कम सोबत होती. निसर्गाचा सहवास होता म्हणून लढायला ताकद मिळाली. उसाच्या पालाची झोपडी म्हणजे माझं घर. मी मायच्या पोटात होतो तेव्हाच वडील वारले. घरची एवढी गरिबी की वडिलांचा साधा फोटो काढायलाही पैसे नव्हते. माझे वडील कसे होते हे मला कधीच कळलं नाही. आमच्याकडे ना जमीन होती ना शेती. घरात कर्ता पुरुषही नव्हता. मायवरच सगळी जबाबदारी येऊन पडली; पण ती डगमगली नाही की कधी रडली नाही. ती पोट चालवण्यासाठी मोहाची दारू गाळण्याचा व्यवसाय करत होती. घरातच चालायचा तो. पिणारेही घरीच यायचे. माय सांगते, मी लहान होतो. दुधा...

Navoday Result 2013

Image
* नवोदय प्रवेश परीक्षा 2023* निकाल पाहण्यासाठी ... खालील link ला क्लिक करावे  https://cbseit.in/cbse/2023/nvsresult/Result.aspx निकाल पहा व ग्रुप वर पाठवा ... रोल नंबर आणि जन्मदिनांक आवश्यक निवड झाली असल्यास . खूप खूप शुभेच्छा .

बुद्धिमत्ता _ Gardner

३.२.५ बहुविध बुद्धिमत्ता - (गार्डनर) गार्डनर हे प्रोजेक्ट झिरो या कला शिक्षणविषयक प्रकल्पात संशोधन कार्य करत होतो. गार्डनर यांचे हे संशोधन दोन दिशांनी माहिती संकलित करत होते. त्यामध्ये एक दिशा म्हणजे सामान्य व असामान्य मुलाच्या बुद्धिमत्तेबाबत संशोधन करणे आणि दुसरी दिशा म्हणजे ज्या प्रौढ व्यक्ती यांच्या मेंदूला इजा पोहचली आहे त्यांच्या विविध प्रतीकांच्या व्यापराच्या क्षमतांचा अभ्यास करणे, या दोन प्रकारच्या केलेल्या संशोधनातून गार्डनर यांना बहुविध किया बहु आयामी बुद्धीमत्तेचा सिद्धांत मांडण्यास खूप मदत झाली. बुद्धिही संकल्पना बुद्धीशी व बुद्धी ही मेंदूशी संबंधित संकल्पना आहे. मेंदू मार्फत घडणान्या आंतरक्रियेचा परिणाम म्हणून विचार प्रक्रिया होत असते व या विचार प्रक्रियेच फलित म्हणजेच वर्तन असते. गार्डनर यांनी मेंदु ब चेतातंतू पावर आधारित बुद्धिमत्ता स्पष्ट करण्याचा प्रयत्न या उपस्थित केलेला आहे. म्हणून गार्डनर यांच्या या उपपत्तीला चेता विज्ञानावर आधारित उपपत्ती असेही म्हटले जाते. गार्डनर यांनी मेंदूची रचना व त्यातील केंद्रात केंद्रांचा उल्लेख करून त्याबाबतचे स्पष्टीकरण केलेले आहे. मेंदूम...

विचार प्रक्रिया

विचारप्रक्रियेचे शैक्षणिक महत्व  मानवामध्ये इतर प्राण्यांच्या तुलनेने प्रगत असलेली ही शक्ती मानवी अध्ययनाच्या दृष्टीनेच नव्हे तर एकूण मानवी जीवनाला उन्नत व पाच्या दृष्टीनेदेखील अत्यंत महत्त्वपूर्ण अशी आहे. विद्यार्थ्यांमध्ये या शक्तीचा विकास होण्याच्या दृष्टीने शिक्षकाने अधिक जागरूक असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना केवळ माहिती देणे म्हणजे अध्यापन नव्हे. ही बाब ध्यानी घेऊन शिक्षण तज्ज्ञांनी अभ्यासक्रम तयार करताना तसेच पाठ्यपुस्तके तयार करताना विद्यार्थी अधिकाधिक विचारप्रवृत्त कसा होईल याकडे लक्ष पुर आवश्यक आहे. 4) पियाजेच्या संशोधनानुसार, विचारप्रक्रिया हो अगदी बालकाच्या जन्मापासून प्रगत होत जाते. म्हणून लहान मुलांना लहान लहान गोष्टी सांगून त्यातून तात्पर्य काढण्यास प्रवृत्त केले पाहिजे. iii) बारा ते पंधरा या वयोगटातील मुलांमध्ये तर्कशक्तीचा विकास फार वेगाने होत असतो. म्हणून या वयोगटातील मुलांना अनुमान काढण्याची पद्धती, त्यामध्ये निर्माण होऊ शकणारे दोष याबाबतची माहिती द्यावी.  (iv) शालेय अभ्यासक्रम शिकवित असतानाच तर्काधिष्ठित कोडी, समस्या देऊन त्या सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना...

दहावी नापास इंद्रजीत नारायणराव भालेराव

Image
॥ निकाल ॥ नाव ------------ इंद्रजीत नारायणराव भालेराव  आईचं नाव ---- रखमाबाई  शाळेचे नाव --- जि प्र. मा. शा हयातनगर  वर्ष ------------- १९७९  वर्ग ------------- इयत्ता दहावी  निकाल -------- नापास  परिणाम ------- वर्षभर गुरं राखावी लागली  म्हणून --- 'गाई घरा आल्या' पुस्तक लिहिता आलं. म्हणून --- पुस्तकाला अनेक पुरस्कार मिळाले.                          म्हणून --- पुस्तक विद्यापीठांना अभ्यासाला लागलं.                        म्हणून --- पुस्तकाच्या सात आवृत्ती निघाल्या. कळस --- मॅट्रिक नापास मुलानं लिहिलेला लेख                      कर्नाटकमध्ये मॅट्रिकच्या अभ्यासाक्रमात. 💐

अमिताभ बच्चन यांच्या कडून ही शिका

Image
*ज्यांचे वय 57+ आहे अशा सर्वांना समर्पित वयाच्या 57 व्या वर्षी अमिताभ बच्चन हे दिवाळखोर झाले होते.वयाच्या 80 व्या वर्षी त्यांची संपत्ती 3190 कोटी आहे.मग 57+ वाल्यांनी काय करायला हवे ???* ----------------------------------------------- *11 ऑक्टोबर 2022.अमिताभ ८० वर्षांचा झाले,तरी त्याला 'अहो-जाहो' करणं अशक्य आहे. जग एवढं बदललं नेहरू गेले,मोदी आले.साधी थिएटर गेली,मल्टिप्लेक्स आली.आता तर सिनेमा मोबाइलवर आला.टांगेवाला मर्द गेला आणि ओला, उबेर टॅक्सी आली. कारखाना मालक आणि कामगार यांच्यातल्या 'नमक'चा संदर्भ बदलला.तरीही अमिताभ नावाचा 'सिलसिला' सुरूच आहे.या चमत्कारानं आपलंच डोकं जड होतं.तरी,नवरत्न तेलानं मसाज करायला हा आहेच हजर!* *आज ऐंशीव्या वर्षीही अमिताभ पहाटे पाचला उठून सकाळी आठला सेटवर हजर असतो. आजही दिग्दर्शकांच्या सूचनांबरहुकुम काम करत असतो.* *अमिताभचे समकालीन मित्र काळाच्या पडद्याआड गेले.जे आहेत,ते उपकारापुरते उरले. पण,अमिताभ आहेच.* *कोण्या पन्नाशीतल्या बाल्कीला अमिताभसाठीच 'चिनीकम' करावा वाटतो किंवा 'पा' मध्ये अमिताभला लहान मूल करावे ...