Posts

Showing posts from October, 2020

बेत्ते नेस्मिथ ग्रॅहम

Image
1951 मध्ये या शॉर्टशॉर्टहँड टायपिंग करणाऱ्या मुलीने व्हाइटनर चा शोध लावला. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात ती टायपिस्टची नोकरी करू लागली. टायपिंग मध्ये काही चुका झाल्यास तिला बॉस ची बोलणी खावी लागत असत. चित्रकार आपली एखादी चूक झाल्यास त्यावर पांढरा रंग लावतात हे तिने पाहिले होते. त्याच धर्तीवर तिने पांढरा रंग आणि काही रसायने वापरून एक मिश्रण तयार केले. आपल्या चुकांवर ते मिश्रण लावून बेत्त बिनचूक कागदपत्रे तयार करू लागली. हे गुपित तिने आपल्या इतर टायपिस्ट मैत्रिणींना सांगितले. तिच्याकडून हे मिश्रण घेऊन मैत्रिणी वापरू लागल्या.घरीच स्वयंपाक घरात घरगुती मिक्सर वर बेते हे मिश्रण तयार करीत असत परंतु मागणी वाढल्यामुळे तिला वेळ मिळेनासा झाला तिच्या बॉसने तीला कामावरून काढून टाकले. मग तिने स्वतःची कंपनी सुरू केली मिस्टेक आऊ ट या गमतीशीर नावाने तिने हे उत्पादन सुरू केले.

महान बुद्धिमत्ताच स्वतःचा विचार करते

Image
इमॅन्युएल केंट आधुनिक तंत्रज्ञानाचे केंद्रबिंदू मानले जात. मानवाचा मेंदू त्याच्या विचारांची इमारत बांधतो या चर्चेला त्यांनी तोंड फोडले.  जन्म - 22 एप्रिल 1724.    मृत्यू - 12 फेब्रुवारी 1804 तुमच्याकडे जे आहे त्यावरून तुम्ही श्रीमंत बनत नाही, तर जे नाही त्याच्याविना काम भागवून तुम्ही श्रीमंत बनत असतात. कमजोर माणसाची शक्ती आहे धैर्य, शक्तिशाली माणसाची कमजोरी बेचैनी. खोटे हे तर खोटेच असते मग ते चांगल्या हेतूने ही बोललेले का असेना. डोळे, मित्र आणि त्याची आवडती व्यक्ती  बाबत खूप काही सांगत असतात. तुम्ही मला जेवढे पाहू शकता तेवढेच जाणू ही शकता मात्र मी वास्तवात कसा आहे हे जाणू शकत नाही. व्यक्ती मनाच्या अंदाज गुरांशी त्याची वागणूक कशी आहे यावरून सुद्धा लावला जातो. उचित असतात म्हणूनच उचित कामे करा. महान मेंदूच स्वतः बाबत विचार करतो. मनुष्याने शिस्तप्रिय असणे अतिशय गरजेचे कारण त्याचा स्वभाव रानटी असतो. बुद्धिमान व्यक्तीच स्वतःला बदलू शकते जिद्दी व्यक्ती कधीच बदलू शकत नाही. - इमॅन्युएल केंट

नवोदय माहिती

5 वी नवोदय प्रवेश परीक्षा Online form भरण्याचा अंतिम दिनांक - 15 डिसेंबर 2020 परीक्षा दिनांक - 10 एप्रिल 2021 Form व अधिक माहिती साठी http://www.navodaya.gov.in Prospect Download करण्यासाठी पुढे क्लिक करा.. Prospect of JNVS    आज आपण 5 वी नवोदय प्रवेश परीक्षा बद्दल संपूर्ण माहिती घेऊया.   ▪️ *5 वी शिकत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते* • प्रत्येक जिल्ह्यातील 80 विद्यार्थ्यांची निवड होते  • ग्रामीण भागातील विद्यार्थी 60% व शहरी भागातील 40% विद्यार्थ्यांची निवड केली जाते.  • SC / ST/OBC / OPEN आरक्षण आहे.  • निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 6 वी ते 12 पर्यंत जवाहर नवोदय विद्यालय येथे *संपूर्ण मोफत शिक्षण NCERT BOARD प्रमाणे असते* . ▪️ *परीक्षा* • परीक्षा प्रत्येक तालुकास्तराव होते.  • एकूण गुण - 100  • एकूण प्रश्न संख्या - 80  • प्रत्येक प्रश्न - 1.25 गुणासाठी. • परीक्षा वेळ - 2 तास. ▪️ *विषय व गुण* • मानसिक क्षमता - 40 प्रश्न  " 10 प्रश्न असून प्रत्येक प्रश्नात 4 उपप्रश्न असतात. "  • अंकगणित  - 20 प्रश्न...

कासव आणि ससा - कथा जुनी आशय नवीन

Image
*कथा जुनी आशय नवीन*              ससा आणि कासवाच्या शर्यतीत ससा झोपून राहिल्याने हरला. कासव जिंकले पण सशाला शांत बसवेना . आपल्यात वेगाने पळण्याची क्षमता अधिक असूनही निव्वळ झोपल्यामुळे आपण हरलो हे त्याच्या लक्षात आले. पराभवाचा हा सल संपविण्यासाठी त्याने कासवापुढे पुन्हा शर्यतीचा प्रस्ताव ठेवला. विजयाच्या आनंदात आपण जिंकू शकतो, यावर विश्वास बसलेल्या कासवाने होकार भरला. शर्यत पुन्हा सुरू झाली. यावेळी सशाने चूक केली नाही. तो थांबला नाही. झोपला नाही. परिणामी, वेगवान ससा शर्यत जिंकला. हळू चालणारे कासव हरले. *पण एकदा विजयाची चव चाखलेलं कासव हार पत्करायला तयार नव्हतं.* कासव पुन्हा सशाकडे गेलं. म्हणालं,'मी तुझं ऐकलं. आता तू माझे ऐक. आपण पुन्हा शर्यत लावू !'ससा हसला आणि म्हणाला,  *"एकदा माझ्या चुकीमुळे हरलो. पुनःपुन्हा मी ती चूक कशी करेन ?* पण तुझी हरण्याचीच इच्छा असेल तर लावू पुन्हा शर्यत !' सशाचा होकार मिळाला तसं कासव म्हणालं, 'पण यावेळी शर्यतीचा मार्ग मी ठरवणार !' स्वतःच्या वेगाची आणि कासवाच्या धिम्या गतीची खात्री असलेल्या सशाने त्यालाही होकार भरला . ...

डॉ.ए.पि. जे.अब्दुल कलाम यांचा जीवन परिचय

Image
*डॉ.ए.पि. जे.अब्दुल कलाम यांचा जीवन परिचय* पूर्ण नाव : अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम जन्म  : १५ ऑक्टोबर १९३१, रामेश्वर नागरिकत्व : भारतीय राष्ट्रीयत्व : भारतीय धर्म : मुस्लीम पुरस्कार : पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’, ‘भारतरत्न वडील : जैनुलाबदिन अब्दुल अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम (तमिळ: அவுல் பகீர் ஜைனுலாப்தீன் அப்துல் கலாம்) (जन्म ऑक्टोबर १५, १९३१, तमिळनाडू, भारत) यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्या नावाने ओळखले जाते. हे भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २५ जुलै, इ.स. २००२ ते २५ जुलै, इ.स. २००७) होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते ‘लोकांचे राष्ट्रपती’ म्हणून लोकप्रिय झाले. अनुक्रमणिका १. शिक्षण २. कार्य ३. गौरव ४. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची कारकीर्द ५. अब्दुल कलाम यांनी लिहिलेली पुस्तके ६. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तके ७. संदर्भ * शिक्षण * त्यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत. डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्‌ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र ग...

गुळवेलाचे फायदे

Image
गुळवेल हे वरदान व राष्ट्रीय औषध म्हणून जाहीर केले त्याबद्दल उपयुक्त माहिती... 🙋‍♂🌴🙋🙋‍♂🌴🙋🙋‍♂👇🏻 गुळवेल  ========== दिव्य औषधी ‘गुळवेल’ ही आयुर्वेदातील महत्त्वाची वनस्पती आहे. गुळवेल या वनस्पतीस ‘अमृता’ हे नाव देखील आहे. कारण, ती अमृतासमान गुणकारी आहे. गुळवेल माणसाच्या अगणित व्याधींना दूर करून त्यास दीर्घायुषी करते.  गुळवेल ही अनेक वर्षे टिकणारी, एखाद्या झाडाच्या वा दुसर्‍या कोणत्याही आधाराला धरून वर चढणारी, नेहमी हिरवीगार राहणारी वेल आहे. दोन फांद्यामधून फुटणार्‍या बारीक दोर्‍यासारख्या तणावाच्या साहाय्याने आधाराला धरून गुळवेल वर चढते. गुळवेल ही दिसायला मनीप्लांटसारखी परंतु, अतिशय दाट अशी विशाल वेल असते. पाने हृदयाच्या आकाराची असतात. यास पिवळी फुले येतात व लाल रंगाची छोटी छोटी गोल फळे झुबक्यांमध्ये लागतात. याचे कांड रसभरीत असते, ज्याचा औषधीकरिता उपयोग केला जातो. गुळवेलीची अमृतासमान, रसायनी वा वयस्था (तारुण्याचे रक्षण करून म्हातारपण व रोगाचा नाश करणारी) अशी आयुर्वेदीय समर्पक नावे आधुनिक संशोधनाने यथार्थ ठरली आहे. गुळवेलीच्या मोठ्या वेली मांसल असून, मोठ्या झाडा...

प्रेरणादायी विचार 1

📍 कधीही शाळेत न गेलेले छत्रपति  स्वराज निर्माण करतात 📍जातीय व्यवस्थेमुळे अपमान सहन करणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारताची राज्य घटना लिहितात. 📍आईचे प्रेम आणि बापाचे छत्र नसलेला 'बराक'नावाचा पोर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होतो 📍पेट्रोलपंपा वर काम करणारे 'धीरुभाई' करोड़ोंचे साम्राज्य उभे करतात... 📍कॉलेजच्या प्रवेश फी साठी पैसे नाहीत म्हणून बहिणीचे दागिने गहाण ठेवणारे 'अब्दुल कलाम' राष्ट्रपती पदापर्यंत जाता 📍रोजगार हमीच्या कामावर जाणारे आर.आर.पाटील राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री होतात. 📍सत्तावीस वर्ष तुरुंगात काढणारे 'नेल्सन मंडेला' जगाला प्रेम शिकवतात. 📍कुठलीही शारीरिक हालचाल न करू शकणारे 'स्टीफन हॉकिंग' जग हलवणारे संशोधन करतात... "शुन्यातून प्रवास करत माणसे प्रेरणादायी जग निर्माण करतात..." मग, आम्ही का नाही???" 🍒 माणूस किती किंमतीचे कपडे वापरतो यावरून त्याची किंमत होत नसते,  परंतु, तो इतरांची किती किंमत करतो,किती सकारात्मक विचार करतो,परिस्थितीशी कसा लढतो  यावरून त्याची किंमत ठरत असते . 🍒 🐧पक्षी जेंव्हा जिवंत असतो तेंव्हा तो...

संपूर्ण आयुर्वेद लिहिलंय शॉर्ट मध्ये

Image
संपूर्ण आयुर्वेद लिहिलंय शॉर्ट मध्ये हे वाचल्यावर अक्षरशः काही वाचायची गरज नाही! वाचा आणि पालन करा. || शरीराला आवश्यक खनिजं || *🔺कॅल्शिअम* कशात असतं? शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी. ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर कमतरतेमुळे काय होतं? हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे कार्य काय असतं? शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती आणि शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं. 🌺🌺🌺े *🔺लोह* कशात असतं? खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, सीताफळ, उस, बोर, मध, पपई आणि मेथी कमतरतेमुळे काय होतं? शरीरात रक्ताची कमतरता भासते. अशक्तपणा, कावीळ किंवा पोटात मुरडा येतो. कार्य काय असतं? शरीराच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असतं. 🌺🌺🌺े *🔺सोडिअम* कशात असतं? मीठ, पाणी, बटाटा, आलं, लसूण, कांदा, मिरची, पालक, सफरचंद, कारलं कमतरतेमुळे काय होतं? रक्तदाबाशी निगडित समस्या, निद्रानाश, अंगदुखी, अपचन, मूळव्याधीसारखे आजार, मोतीबिंदू, बहिरेपणा, हात अणि पाय कडक होणे. कार्य काय असतं? शरीराला आवश्यक असणारी पाचक रसायनाची निर्मिती करतात, त्याचप्रमाणे शरीरात होणारा गॅस नष्ट होतो. 🌺🌺🌺े *🔺आ...

कथा - टमाटे

Image
----------------- नीतिकथा ----------------- 🍅 एकदा शिक्षिकेने तिच्या विद्यार्थ्यांना प्लॅस्टिकच्या पिशवीतून काही टमाटे शाळेमध्ये आणावयास सांगितले. 🍅 प्रत्येक टमाट्यावर त्या मुलांनी, ते ज्या व्यक्तिचा द्वेष करत असतील त्याचे नाव लिहून आणावयाचे होते. 🍅अशा रीतीने, जेवढ्या व्यक्तींचा ते द्वेष करत असतील तेवढेच टमाटे त्यांनी आणावयाचे होते. 🍅 ठरलेल्या दिवशी, सर्व मुलांनी व्यवस्थित नावे टाकलेले त्यांचे टमाटे आणले. 🍅 काहींनी दोन, काहींनी तीन, काहींनी पाच तर काहींनी वीस टमाटे, ते द्वेष करीत असलेल्या संख्ये बरहुकूम आणले. 🍅 शिक्षिकेने नंतर सर्वांना सांगितले की, त्यांना ते टमाटे ते जिथे जिथे जातील त्या सर्व ठिकाणी दोन आठवडे बरोबर घेऊन जायचे आहेत.  🍅 जस जसे दिवस उलटू लागले, तस तसे मुले टमाट्यांच्या कुजण्याची आणि दुर्गंधीची तक्रार करू लागले. 🍅 ज्या विद्यार्थ्यांकडे संख्येने जास्त टमाटे होते त्यांनी तक्रार केली की, त्यांच्याकडची ओझी वाहून नेण्यास अतिशय जड असून दुर्गंधही फारच सुटलेला आहे. 🍅 आठवड्यानंतर, शिक्षिकेने विद्यार्थ्यांना प्रश्न केला, " तुम्हाला या आठवडाभर कसे वाटले ? ...

महात्मा गांधी गोष्ट - 1

Image
महात्मा गांधी गोष्ट - 1 गांधीजी दुसरी-तिसरीत इंग्रजी शिकत होते. शाळेत एकदा विद्या अधिकारी तपासणीसाठी आले आणि त्यांनी वर्गात सर्व विद्यार्थ्यांना पाच इंग्रजी शब्द लिहायला दिले. वर्गशिक्षक फिरत फिरत तिरप्या दृष्टीने विद्यार्थी काय लिहितात ते पहात होते. त्यांची छाती धडधडत होती. कुणी चुकीचे लिहिले तर अपयशाचे खापर शिक्षकांच्या डोक्यावरच फुटणार ना? अधिकारी म्हणतील, शिक्षकांनी चांगले शिकविले नाही.  मोहनदास यांनी केटल (kettle) शब्दाचे शुद्धलेखन चुकीचे लिहिले होते. ते शिक्षकांच्या लक्षात आले; पण बिचारे काय करणार फिरत फिरत ते त्याच्या जवळ गेले आणि त्याच्या पायावर बुटाच्या टोकाचा स्पर्श केला, डोळ्यांनी खून करून शेजार च्या विद्यार्थ्यांची पाटी दाखवली.  पण चोरी करावी असा विचार मोहनदासच्या स्वप्नात देखील आला नव्हता. त्यांना कसे समजणार की, गुरुजी दुसऱ्यापासून चोरी करून शुद्धलेखन लिहिण्याचा धडा देत आहेत.  दुसऱ्या दिवशी गुरुजींनी सांगितले, "खरोखर, मूर्ख मुलगा! किती सूचना देऊन सुद्धा समजले नाही."   गांधीजी गुरुजी समोर बोलले नाहीत पण मनात समजले की त्यांचा उद्देश घेण्यासारखा...