Posts

Showing posts from June, 2024

प्रगतशील शेतकरी तथा मराठवाडा रत्न भास्करराव पडूळ यांचा संक्षिप्त परिचय

Image
प्रगतशील शेतकरी तथा मराठवाडा रत्न भास्करराव पडूळ यांचा संक्षिप्त परिचय अंतरवाला ता. जि. जालना येथील सामान्य कुटुंबात जन्म घेऊन केवळ जालनाचेच नव्हे तर शेती विषय, हवामान बदल या विषयांमध्ये भारताचे  जगामध्ये प्रतिनिधीत्व करणारे  भास्करराव पडूळ यांनी संघर्षमय जीवनातून सुद्धा यशाची अनेक शिखरे पदाकांत केली आहेत. शेती संदर्भात 30 पेक्षा जास्त देशाची वारी करणारे भास्करराव पडूळ हे जालन्यातील एकमेव व्यक्ती असतील. विविध देशांमध्ये त्यांची व्याख्याने असतात. एवढेच नव्हे तर स्थानिक लोकांना रोजगारांच्या संधी व आयात निर्यात याबद्दलही योग्य ते मार्गदर्शन करतात त्यासाठी त्यांनी BPG फार्मर प्रोडूसर कंपनी या  संस्थेची स्थापना केली आहे. एड्सग्रस्त लोकांना मोफत औषधोपचार त्यांच्या संस्थेद्वारे सुद्धा केले जातात. भास्करराव पडूळ यांना मिळालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे 🌟⭐️🏆 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा रत्न अवार्ड कृषिभूषण रावसाहेब कडलक राज्यस्तरीय कृषी क्रांती पुरस्कार  युवा समूह प्रकाशन राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार  युवा समूह प्रकाशन मानव भूषण पुरस्कार  दलित साहित्य ...

सरपंच सुविचार

_*समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात, म्हणून मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा कारण त्याने मन हलकं तर होईलच व लढण्याची ताकद पण येईल..!*_ _*यशस्वी होण्याचे सगळे मंत्र, मेहनत या शब्दाने सुरु होतात...*_ _*यशस्वी भरपूर जण असतात परंतु समाधानी फार कमी असतात यश हा जरी तुमच्या कर्तुत्वाचा विजय असला तरीही समाधान हा तुमच्या मनाचा विजय असतो.*_ _*उंच शिखरावर जरुर चढावं पण जगाने आपल्याकडे पहावे म्हणून नाही तर, शिखरावरून आपल्याला जग पाहता यावं म्हणून...*_ *इतरांकडून कमीत कमी "अपेक्षा" आणि स्वतः कडून जास्तीत जास्त "तडजोड" या दोनच गोष्टी प्रत्येकाचं जीवन आनंदी आणि यशस्वी बनवू शकतात.*   *शांतता बऱ्याच समस्यांवर औषध असते पण जेव्हा मान, सन्मान आणि स्वाभिमानावर वार केला जातो तिथं तोंड उघडणे खूप गरजेचे असते. समोरचं संकट पाहून रडायचं की लढायचं हे स्वतः ठरवायचं असतं. रडलात तर संकट तुम्हाला संपवून टाकेल आणि लढलात तर तुम्ही संकटाला संपवून टाकाल. आशिर्वाद आणि सदिच्छा यांना कोणताही रंग नसतो. पण ते मिळाले की, जीवनात रंग भरले जातात. मनाचं भांडवल मोठं असलं की सु...

मुलांना शाळेत पाठवण्या अगोदर हे समजून घ्या...

Image
सर्व पालकांना विनंती की आपल्या मुलांना शाळेत विद्यार्थी म्हणूनच पाठवा. . त्यासाठी... *काही मुद्दे खालीलप्रमाणे असावेत *  *1)* त्याच्या केसांची ठेवण व्यवस्थित असावी. केशभूषा साधी असावी. *2)* पायातील बूट जास्त किमतीचे नसावेत. साधे असावेत.  *3)* शालेय गणवेश व्यतिरिक्त इतर ड्रेस वर जास्त खर्च करू नका. *4)* वह्या आणि पुस्तके योग्य तेवढीच घ्या....  *5)* दादाचा मुलगा, भाऊचा मुलगा या उपाध्या घरीच ठेवून फक्त विद्यार्थी म्हणूनच शाळेत पाठवून द्या. *6)* अँड्रॉइड मोबाईल पासून मुलांना दुर ठेवा.....  *7)* मुलांचे चुकीचे लाड आणि हट्ट पुरवू नका.....  *8)* मुलांचे मित्र तपासा सर्व मित्रांची माहिती करून घ्या. *9)* मुलगा/मुलगी शाळेत जाण्यासाठी घरुन निघतात,खरच शाळेत जातात का याची वरचेवर शिक्षकांना फोन करून शहानिशा करा. *10)* व्यसनाधीनतेचं वाढते प्रमाण लक्षात घेता आपल्या पाल्याविषयी त्याबाबतीत सतर्क रहा.  *11)* तुमची क्षमता असली तरी आपल्याकडे काहीतरी कमी आहे, उणीव आहे हे त्याच्या लक्षात येऊ द्या......  *12)* पैशाचे महत्त्व त्याला कळू द्या....  *13)* शाळेत प...