5 फेब्रुवारी

*📚परीपाठ🌳*

*❂दिनांक:~ 05 फेब्रुवारी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *📖 सुविचार 📖*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*💡दुबळी माणसे भूतकाळात जगत असतात आणि सामर्थ्यवान माणसे भूतकाळातून शिकत असतात.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🌈म्हणी व अर्थ 🌈*

*💪बळी तो कान पिळी.*

*💫अर्थ:-*
*बलवान मनुष्यच इतरांवर सत्ता गाजवतो.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
             *📆 दिनविशेष 📆*   

 *🌎जागतिक मौखिक आरोग्य दिन*

*🌞या वर्षातील🌞 ३६ वा दिवस आहे.*

    *🗞 महत्त्वाच्या घटना 🗞*

*👉१९५२ : स्वतंत्र भारतात प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या.*
*👉१९१९ : चार्ली चॅप्लिनने इतर तीन जणांबरोबर युनायटेड आर्टिस्ट्स कंपनीची स्थापना केली.*
*👉१६७० : सिंहगड ताब्यात मिळवण्यासाठी नरवीर तानाजी मालुसरे यांनी प्राणाची आहुती दिली.*

    *🌹जन्मदिवस / जयंती🌹*

*👉१९७६ : अभिषेक बच्‍चन – अभिनेता*
*👉१९३६ : बाबा महाराज सातारकर – कीर्तनकार*
*👉१९१४ : शंकर गोपाळ तथा शं. गो. तुळपुळे – प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी, संत वाङ्‌मयाचे अभ्यासक*

      *💐मृत्यू / पुण्यतिथी💐*

*👉२००८ : महर्षी महेश योगी – योग गुरू*
*👉२००३ : गणेश गद्रे – ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व महात्मा गांधींच्या 'हरिजन' या मराठी अंकाचे संपादक*
*👉१९२० : आळंदी येथील वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक विष्णू नरसिंह जोग यांनी समाधि घेतली.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*👉महाराष्ट्रात पोस्टाची कार्ड व पाकिटे छापन्याचा कारखाना कुठे आहे?*
*🥇नाशिक*

*👉महाराष्ट्रात सर्वात जास्त कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे?*
*🥇विदर्भ*

*👉मराठवाडयाची राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते?*
*🥇औरंगाबाद*

*👉पंचायतराज स्वीकारनारे पहिले राज्य कोनते?*
*🥇राजस्थान*

*👉IOC चे संक्षिप्त रूप काय?*
*🥇इंटरनेशनल ऑलंपिक कमिटी*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🕸 बोधकथा 🕸*

     *▪भिञा व शूर मिञ▪*
   
     *एक चोर दोन मिञांवर हल्ला करतो. त्यातला एक मित्र जीव वाचविण्यासाठी पळून जाऊन लपून बसतो. पण दुसरा शूर मित्र चोराचा मुकाबला करतो आणि त्याला जखमी व निशस्ञ करतो. हे पाहून डरपोक, भिञा मित्र परत येतो. तिथे जवळ एक लाकूड पडलेले असते ते लाकूड घेतो आणि चोराला म्हणाला 'थांब आता मी तुला माझी बहादूरी दाखवतो. त्याला माहित होते कीं, चोर आता त्याचे काही नुकसान करू शकत नव्हता.त्यामुळे भिञ्या मिञांने परिस्थितीचा फायदा घेतला. तो चोरासमोर बढाया मारू लागला.शूर मित्र त्याला म्हणाला, तूं आता शौर्याचे नाटक नको करूस.स्वतःच्या हातातील लाकूड फेकून दे . तू अशा वागण्याने दुस-यांना मुर्ख बनवू शकतो. मला तुझे खरे रूप कळले आहे. खर म्हणजे तू येथेच थांबून माझी मदत करायला हवी होती. धीराचे शब्द उच्चारून माझा आत्मविश्वास वाढवायला हवा होता .मी पाहिले आहे तूं किती भिञा आहे.  तूं तुझा जीव वाचवून पळून गेलास.  कुठल्याही संकटाच्या क्षणी तुझ्या सारख्या माणसांवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. हे ऐकून भिञा मित्र खाली मान घालून तेथून निघून गेला.*

 *_🔔तात्पर्य_ :-*
  *विश्वासाला कधी तडा जाऊ देऊ नये*.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
         

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

जालना नवोदय कट ऑफ लिस्ट 2025

इतिहासात पहिल्यांदाच नवोदय परीक्षामधील मुलांचे मार्क कळत आहेत. बघा यावर्षी चे मार्क्स