Posts

Showing posts from September, 2020

संशोधक - जाॅन वालर

Image
चला आज तुम्हाला थोड्या एका ‘हटके’ संशोधन आणि संशोधकाची गोष्ट सांगतो.. सामान्यतः संशोधक किंवा शास्त्रज्ञ म्हटला वाढलेली दाढी-लांब केशसंभार-डोळ्यांवर भिंगाचा चष्मा-अंगात लांब डगला-हातात पुस्तक आणि ‘प्रयोग’ म्हटलं की परिक्षानळ्या-चंचुपात्र-लॅब वगैरे असं चित्र डोळ्यांसमोर येतं पण वस्तूत: तसं काही नाही.. अनेक सरळासाध्या लोकांनी वरवर साधे वाटणारे अनेक संशोधन केलेत ज्यांनी आख्खं जग बदलून टाकलं.. पेटंट कार्यालायतील व्यवस्थापक असलेल्या जाॅन वालरनं छोटीशी पेपर क्लिप शोधली नसती तर? कागदं गहाळ झाले असते-गैरसमज वाढले असते-मोठमोठ्या डिल्स गंडल्या असत्या,व्हिटकाॅम्बनं झिप शोधली नसती तर पॅंटपासून बॅगेपर्यंत सगळ्याचे वांदे झाले असते😅 सांगण्याचा मतितार्थ एवढाच की गुरुत्वाकर्षण-सापेक्षतावाद या मोठमोठ्या संशोधनापलिकडंही अनेक छोटे मोठे संशोधन-प्रयोग विज्ञान जगतात झालेत ज्यांनी मोठ्ठा इतिहास घडवला.. विज्ञानजगतातला ‘बॉलपॉईंट’ पेनचा शोध हा देखील कुठल्याही ‘क्रांती’पेक्षा कमी नाही.. जगातला असा कोपरा नाही जिथं ‘बॉलपॉईंट’ पेनचा वापर होत नाही.. बॉलपॉईंट पेनचा शोध आजपासून सुमारे आठ दशक आधी १९३१ साली ल...

संत आणि राजा

         संत आणि राजा *एक दानशूर राजा होता. राजाची ख्याती ऐकून एक संत त्याच्या दरबारात आला. तो राजाला भेटायला राजमहालात गेला आणि याचकांच्या रांगेत बसला.*  *राजाने दान देण्यासाठी दोन सेवक ठेवले होते. जेंव्हा संताची वेळ आली तेंव्हा तो सेवकाला म्हणाला, '' मित्रा! मी तुझ्या हाताने नाही तर राजाच्या हाताने दान घेईन. नाहीतर मला दान नको."* *राजाचा सक्त आदेश होता कि... कोणीही रिक्त हस्ते जाता कामा नये. शेवटी सेवकांनी राजाची व संताची गाठ घालून दिली. राजाने संतांच्या पायाचे दर्शन घेतले व म्हणाला," महाराज ! बोला आपली काय इच्छा आहे? "* *संत म्हणाले," मला इतके धन पाहिजे कि मी त्याद्वारे स्वर्गात जावू शकेन."* *राजा या उत्तराने हैराण झाला. त्याने विचारले," महाराज, धनाद्वारे आपण कसे काय स्वर्गात जावू शकता ? कृपया स्पष्ट करा!"*  *तेंव्हा संताने सांगितले," राजन! मी आपल्याला हे सांगू इच्छितो कि, केवळ दान देण्याने आपण सुखी व्हाल आणि भिक्षा मागणा-याच्या जीवनात परिवर्तन येईल पण आपण असेच जर दान करीत राहिलात तर मात्र एक दिवस राज्याची तिजोरी मात्र खाली होवून जाईल....

गौतम बुद्धांची शिकवण

Image
      गौतम बुद्धांची शिकवण *एकदा गौतम बुद्ध आपल्या काही शिष्यांसह एका गावातून निघाले होते. गावातून जात असताना एक रागीट मनुष्य धावत धावत त्यांच्यासमोर आला व तो वाद घालू लागला... " तुम्ही तत्त्वज्ञानी नाहीत. तुम्ही विद्वान नाहीत. तुम्ही हा सारा बनाव करत आहात...." अशा शब्दांत तो बुद्धांवर टीका करू लागला.* *स्वत:च्या तंद्रीत आणि रागाच्या भरात तो मनुष्य सलग एक तास बरेच काही बरळत राहिला. त्याच्या तोंडातून काही शिव्याही गेल्या. दरम्यान बुद्धांच्या काही शिष्यांना हा प्रकार सहन झाला नाही. ते त्याच्या अंगावर धाऊन जाऊ लागले. मात्र बुद्धांनी त्यांना खुणेने शांत राहायला सांगितले.* *काही वेळाने तो टीका करणारा मनुष्य शांत झाला. आतापर्यंत तो एकटाच बोलत होता. बुद्ध आणि त्यांचे शिष्य हा सारा प्रकार फक्त शांतपणे ऐकत होते. आपण एवढी टीका केली आणि त्यावर आपल्याला कोणीच काही म्हणत नाही हे पाहून तो मनुष्य जरा बावरला आणि इकडे तिकडे पाहू लागला.* *तो बुद्धांना म्हणाला, " मी तुम्हाला एवढं बोललो, शिव्या दिल्या. तुम्हाला राग नाही आला ? तुम्ही शांत कसे ? "* *त्यावर बुद्ध म्हणाले, ...

राग काटकसरीने कसा वापराल?

राग काटकसरीने कसा वापराल?  *रागातल्या ऊर्जेचा सकारात्मक वापर कसा करावा?*  (माझ्यावरच एक जवळची प्रिय व्यक्ती रागावल्याने सुचलेला लेख, त्याच व्यक्तीस समर्पित) प्रश्न – मला राग खुप लवकर येतो, नंतर मला पश्चातापही होतो, मला माझी ही सवय बदलायची आहे, ही सवय बदलण्यात आपण माझी मदत करु शकता का?,  सर्वप्रथम आपले मनःपुर्वक अभिनंदन, कारण तुम्ही हे मान्य केलेत, आणि तुम्ही आयुष्यात नवे सकारात्मक बदल घडवण्यासाठी उत्सुक आहात, सज्ज आहात, त्यामुळे अर्धा विजय तर इथेच झाला. *मी चुकतोय/चुकतेय, हे कळणे, म्हणजे आपोआपच पुढची चुक टाळणे; नाही का?* आता तुमच्या प्रश्नाकडे वळुया, मी तर म्हणेन, दाग अच्छे है, च्या धर्तीवर राग चांगला असतो, असे म्हणणे योग्य ठरेल. उदा. आपल्याला कचर्‍याचा राग येतो, म्हणुन तर आपण स्वच्छता ठेवतो, आपल्याला गरीबीचा तिटकारा असतो म्हणुन आपण रोज कामावर जातो, लोकांनी केलेल्या अपमानाचा आपल्याला राग येतो म्हणुन तर, इच्छा असो वा नसो, आपण आपलं काम चोखपणे पार पाडतो! *राग ही एक उर्जा आहे, आपल्यालाही राग येतो आणि असामान्य लोकांनाही राग येतो, पण ते लोक आपल्या रागातुन निर्माण झालेल्या उर्जा...